विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी विमुक्त भटक्या समाजासाठी सुद्धा स्वतंत्र कॉलम असावा यासाठी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली व निवेदन सादर केले. खासदार साहेबांचे जाहीर आभार मानले पाहिजे. कारण जातीय जनगणना जातिनिहाय व्हावी व ओबीसी समुदायासाठी स्वतंत्र कॉलम असावा म्हणून भारतात हजारोंच्या वर आंदोलने झालीत परंतु कालपासून सुरू झालेल्या जनगणेच्या पहिल्या टप्प्यात ओबीसी चा कॉलमच गायब आहे.
महाराष्ट्रात जनगणना १६ मे ते १४ जून २०२६ पर्यंत होणार आहे. अजूनही वेळ आहे. सर्वपक्षीय खासदारांनी एकत्रित येऊन प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटून जनगणनेत सुधारणा करावी व ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी मान्य करावी. अन्यथा ओबीसींना जनगणनेतून माघार घ्यावी लागेल असहयोग दाखवावा लागेल. त्यासाठी महाराष्ट्रातील ओबीसी आमदार – खासदारांनी एकत्र यावे असे प्रखर मत सकल ओबीसी महामोर्चाचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम यांनी व्यक्त केले आहे.
*Devashish Govind Tokekar*
Editor/Reporter/Journalist
*INDIAN PRESS UNION*
District Reporter
Disclaimer
This report is based on statements and opinions expressed by individuals and organizations. The platform has not independently verified all claims.