Akola:
अकोला जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट जाणवत असून तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात दुपारी ११ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. आवश्यक असल्यास डोक्यावर टोपी, छत्री किंवा कापड वापरावे.
पुरेसे पाणी, ताक, लिंबूपाणी यांसारखे द्रवपदार्थ सेवन करणे आवश्यक आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी.
उष्माघाताची लक्षणे जसे की चक्कर येणे, मळमळ, अशक्तपणा जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तसेच वाहनांमध्ये ज्वलनशील वस्तू ठेवू नयेत आणि पार्किंग करताना वाहन सावलीत ठेवावे. घरात योग्य वायुवीजन ठेवणे आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास न ठेवता अधिकृत स्रोतांवरूनच माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.